Posts

Showing posts from June, 2016

निब्बर मनाची गब्बर यंत्रणा...!

Image
साधारण दहा साडे दहाच्या आसपास आम्ही तिथे पोहचलो. आम्ही पोहचन्यापूर्वी पंधरा वीस जन हॉल मधे बसलेले होते. त्यात चार पाच जनी होत्या आणि बाकीचे....! गेल्या पंधरा वीस दिवसांपासून हे सारे जन एकाच गोष्टिवर काम करत होते आणि आज त्यांच्या कामाची पाहणी करुन पुढील रूपरेषा सावनेरकर साहेब  सांगणार होते. प्रत्येक जन सावनेरकर साहेबांची वाट पाहत सोबत आणलेल्या फ़ाइल मधे बघून अति विशेष अशा प्रकारात सहज बसेल अशी चर्चा करत होते. तशी हॉल मधे व्यवस्था छान होती...एयर कंडीशन मधे कोपऱ्यात कॉफी मेकर मशीन होती आणि प्रत्येकाच्या समोर मिनरल वाटरच्या बाटल्या पोज़ देत होत्या....! समोरच्या प्रोजेक्टर स्क्रीन वर लिहिलेलं मी वाचत होतो तितक्यात सावनेरकर साहेब आणि त्यांचे सहकारी असे एकूण चार जन आत आले. खुपच मोठा अर्थपूर्ण पॉज घेऊन साहेबांनी बोलायला सुरुवात केली,"आज आपण सर्व जन या ठिकाणी 'एकात्मिक कुपोषण निर्मुलन कार्यक्रम' अंतर्गत कुपोषणाची कारणे आणि उपाय या वर तुम्ही केलेल्या कामाची तपासणी करणार आहोत" एक एक करून साहेबांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सगळ्या फाइली तपासल्या आणि काही दुरुस्तीचे शेरे सु

मस्त फ़कीरा

मस्त फकिरा आज भेटले फ़क़ीर खुप छान हो हँसले किती गोड सांगू हसु बाळ सानुले भासले निरागस भाव सारे निरागस हावभाव निरागस प्रेम त्याचं घेई हृद्याचा ठाव माला बोलले हसून हो रे बाळा तू ही बाळ निरागस लहान हो घाल मोतियाची माळ भाव निरागस मनी शुद्ध प्रेम हे उपजे निरागस बाळाचे ते तेच विठुचे रूप जे चला होऊ निरागस प्रेम फकिराचे सांगे हसु लहान लहान देव हाच भाव मांगे 💜🌺💜 चला निरागस होउयात लहान होउयात। 💜🌺💜

लपंडाव

दहा,विस्,तीस,चाळीस,पन्नास,साठ,सत्तर,ऐंशी,नव्वद,शंभर आलो रे भो.......लपून छपुन रहा रे भो...... परत राज्य देणार नै रे भो....... लपणारे आपले मित्र जे की काही काळासाठी शत्रूच् म्हणुयात.... पण त्यांना सुद्धा लपन्यासाठी वेळ देणारा खेळ.....लपंडाव...! धप्पा मात्र असतो अचानक...... धप्पा...! आणि धप्पा झाला की खेळ पुन्हा सुरु......अगदी सुरुवाती पासून....! जसा धप्पा तसेच अंडल-गंडल......ज्या भीडूच्या नावानं इस्टॉप् केलं त्याच्या ऐवजी दुसराच् तिथं असणं...! आणि पुन्हा खेळ सुरु.....सुरुवाती पासून...! आयुष्य असंच......धप्पा अचानक, मनी ध्यानी नसताना येतो..... सगळं संपल्यासारखं वाटतं पण हीच संधी असते किंवा अपरिहार्यता पुन्हा अगदी सुरुवातिपासून सुरु करण्याची....! आणि अंडल-गंडल सुद्धा असंच...... जगन्याच्या खेळातील एखादी गल्लत..... पुन्हा भाव मनांत सगळं संपल्यासारखे.....! लपंडाव खेळताना राज्य तेव्हाच संपतो जेव्हा सारे भीड़ू इस्टॉप् होतात. थांबू नकोस ........ राज्य अजुन संपला नाही ........ काम,क्रोध,मद,मत्सर,लोभ,मोह....सारे भीड़ू शोधायचे आहेत.... त्यांना इस्टॉप् करायचं आहे.... 'ध्यान&#

comprehensive....म्हणजे सर्वसमावेशक...!

Comprehensive.......म्हणजे सर्वसमावेशक....! विचार जिथे जन्म घेतात तो केंद्र असतो सर्वसमावेशक आणि त्यातून जन्माला आलेले विचार.....सहसा असतात संकुचित.....! कारण विचार असतात सतत आत्मकेंद्रि... स्वतःचा विचार करणारे....संकुचित....! खूप कमी विचार असतात comprehensive...! छत्रपती शिवाजी महाराज एक खूप मोठ्ठा सर्वसमावेशक विचार आणि छत्रपती शाहू महाराज एक दूसरा खूप मोठ्ठा सर्वसमावेशक विचार ....... आणि दोघांनाही सोबत एकाच घरात,एकाच वेळी,एकच विचार म्हणून आजही स्विकारु न शकलेली आमची संकुचित विचारांची पीढ़ी. एक छत्रपती सर्वसमावेशक.....ज्याचं ब्रीद "सर्वांस पोटांसि धरने आहे". एक छत्रपती सर्वसमावेशक......ज्याचं ब्रीद "माझं राज्य गेलं तरी बेहत्तर, मात्र मी अस्पृष्य-उद्धाराचे कार्य कधीच थांबवनार नाही'. एका छत्रपती कड़े समावेशक म्हणून सावल्या तांडेल, तानाजी मालुसरे अन् जीवा महाला... आणि कित्येक... ! एका छत्रपतिकडे समावेशक म्हणून गंगाराम कांबळे,तुकाराम अण्णा...आणि कित्येक....! दोन्ही छत्रपती सर्वसमावेशक comprehensive..! आपण मात्र एक असेल तर दूसरे नको आणि दूसरे असतील तर पहि

हास्य रंग रंगला...!

आज रंग रंगला ईथं गोप दंगला काय सांगू गड्या कसा जिव गुंगला आज लै हसलो नाही आज रुसलो गड्या खरोखर आज सारे ध्यानी बसलो आज मजा लुटली सारे बांधं फुटली चिंतातुर झाडाचीही गड्या फांदी टुटली आज फुलं वाहिलि हसुनिया पाहिली गड्या पंढरिच ईथे येउनीया राहिली आज चिंब भिजलो अहंकारी विझलो गड्या हास्य मंदिरात हसुनिया थिजलो आता हसतच राहु हसुनच जगा पाहु आणि हसत हसत ध्यान झऱ्यामधि वाहु.... 😄☺😄☺😄

फकिराचे दोन शब्द...!

||एक|| गुरु भक्ति ही रुजावी समर्पण ही वाढावे साधने च्या झऱ्यातूनि मनी मळभ काढावे गुरु माऊलीची कृपा त्याले नाही मोजमाप सद्गुरु वाचोनिया कोण हरविल ताप गुरु उपदेशामधी एक तत्त्व हे रुजले कोरडे हे विश्व तुझे गुरुकृपेत भिजले आज साधुनिया घ्यावे आज भाग्य हे दाटले गुरु कृपेचे हे क्षण याची जन्मांत भेटले आता नको दूर लोटु आता जीव हा अर्पुनि आता घे तू साधुनिया जन्मों जन्मिचि पर्वणी ||दोन|| शत्रु कामरूपी अर्थ बुद्धिनाशी लक्ष् ठेव सारे दुःखाच्या रे राशी गनगोत सारे मित्र शत धन गुंतवु नको रे यात् तुझे मन वासना जन्मे जिथं आहे संसार संसार उठ याहुनि ऊपर वैराग्यचे हेच सार तुझी तहान तहान हीच साखळी पायात सोड तिची साथ गड्या तवा येशिल लयात तूच शुद्ध तूच सत्य बाकि सारं झूठ आहे किती सोप्प गूढ़ गड्या जान हीच तूच पाहे किती गड्या जन्म झाली किती शरीर नासले तरी सूटना ही आस तरी सत्यच भासले? नाही व्यर्थ घालविले गड्या पुण्य कमविले साक्षीभाव न जपला संचितच जमविले किती जन्मं फुका गेले दुःख कर्मे त्वां केले सोड कर्ता पण आता साक्षी नेच मोक्ष आले By Vimal

नरसिंग्या....!

:"काय रे सुम्या, इथं काय बसलास एकटाच....!" :"असंच...!" :"आज परत काही बोललं का काय तूला ते नरसिंग्या....!" :"हव....पण माझी कैच चूक नवति, मी तं उलट दीड तासांपासून उन्हातच हुभा होतो...!" :"मंग, काय बोल्लं ते..." :"त्यों मला म्हटला की तुला काय सावलीत बसायचे पैशे देतो काय." :"सावलित ?" :"हव्..त्यों आला तवा मी टेकलो वतो उल्शिक सावलीला....अन् तेवढ्यात त्यों आला." :"सुम्या, तुला किती वेळा बोललो मी...नरसिंग्या लै कडु हाई ते.." :"च्याला पम्या लै जीव वैतगला गड्या...काहीबाहि ईचार यतेत डोक्यात..." :"अय, असं काय यड्यावाणी करतो सुम्या...तूच मला किती धीर देतोस गड्या अन् तूच असं बोलल्यावर काय कराव बबा मंग.......तूच बोलला हतास न की कही लोकं आजारी अस्तेत म्हणून...नरसिंग्या असाच आजारी है बघ...लै बेक्कार आजार असतो भो ह्यव्... त्याला बी कई कळत नै काय करतोय त्यों ते...! तेच कसं हे न सुम्या ह्या आजारात् लै मोठे मोठे गेलेत भो...! पण एक सांगतो बघ सुम्या कई होत नै बघ...!फड़फड़ करुन यतेत परत

लेमनगोळी...!

आमच्या शाळेतल्या लिम्बाच्या झाड़ाख़ाली एक आज्जी रोज बसायची...तिचं छोटसं दुकान थाटून...! मी चारण्याच्या लेमनगोळ्या घ्यायचो अन् दिवस भर चघळीत बसायचो.....मज्जा यायची..! एक दिवस आज्जीच्या दुकानात एक नविनच शक्कल आली...चारण्याच्या चॉकलेट मधी एका चिट्ठित नंबर निघनार आणि त्या नंबर वरुन तुम्हाला बक्षीस....! मी पण घेतलं आणि मला बक्षीस म्हणून लियांडर पेस चं स्टीकर भेटलं...ते मी कंपासात आतून चीटकवलं आणि घरी गेलो..! आई ला सांगितलं आणि ते स्टीकर सुद्धा दाखवलं ......! नंतर काय तर फटकेच फटके..! रडलो ....... रडू थाम्बलं..! आईने तेव्हा सांगितलं ते आज ही पक्क़ लक्षात आहे... चारण्याच्या लेमनगोळ्या चघळण्याची मज्जा तेव्हाच संपली जेव्हा त्या चारण्यात गोळी सोबत स्टीकर आलं... उद्या कदाचित काहीच भेटनार नाही त्याच्यासोबत पण तेव्हा मात्र त्याच्यासोबत मिळालेल्या गोळीची मज्जा हरवून बसेल..कारण आता बक्षीस नाही...हाव मोठी वाईट गोष्ठ...अन् हीच जुगाराची खरी पहिली पायरी..! आणि हे असंच होतं...! दुसऱ्या दिवशी पासून ते आज पर्यन्त लेमनगोळीतच मन अटकवून ठेवलय....कुणी म्हणेलही कदाचित अल्पसंतुष्ठ...तर म्हणू दे......

माझ्या शाळेची पायवाट...!

माझ्या शाळेची पायवाट मी रोजच तुड़वीते अगदी नाचत नाचत... कारण ती पायवाट सुरु झाली की माझ्या कुहू ला मिळतो प्रतिसाद कुठल्यातरी झाडातुन सहज.... फुलपाखरु किती नाजुक आणि सुन्दर ...सहज येवून बसतं माझ्या तळ हातावर... दवबिंदुच्या मोत्याच्या कणांना हात लावत नाही मी कधी कारण मला माहीत आहे की त्याचा झगमगाट सारा खोटाच्...! निसर्गाचं हे चित्र दाखवत दाखवत माझ्या शाळेची पायवाट मला रोज शाळेत घेऊन जाते.... शाळेत 'कोयल' आहे माझ्या....नाजुक अन् सुन्दर....तिच्याकडे असते खूप महागड्या कम्पास पेट्या,पेन,पेन्सिल आणि सारं.... ती माझ्याशी बोलतही नाही... सर, तिला माझ्या शेजारी बसू ही देत नाही आणि हो ती मला तिच्या कम्पास पेटीला हात पण लावू देत नाही.... मला परत आठवते तेव्हा सकाळची माझ्या शाळेची पायवाट..कुहू जी बोलते, नाजुक फुलपाखरु जे येऊन बसतं हातावर, आणि हातात घेतल्यावर संपणारे दवबिंदु...! मला जसं ते चित्र आवडतं निसर्गाचं.... तसं शाळेच्या भिंतीवरचे काही चित्र खूप आवडतात... त्या चित्रांच्या ख़ाली लिहिलेलं असतं पहिल्या चित्राखाली... छ.शाहू महाराज दुसऱ्या चित्राखाली....डॉ.बाबासाहेब आंबेडक

धर्म...दंगल..अन् माणूस..!

धर्म म्हणजे देवाला जाणून घेण्याचा मार्ग... देव जो सर्वव्यापी.. जो जळी,स्थळी,काष्टि, पाषाणी,आत बाहेर सर्व..... पाण्यात बुडालेल्या हंड्या सारखे आपण...पाणी हंड्यात आहे की हंडा पाण्यात हे कसं ओळखनार....अगदी तसं.... हेच कोडं सोडण्याचा प्रयत्न चालू झाला आणि चालू आहे आणि चालू राहील निरंतर.... पूर्वी जग जोडलेलं नव्हतं आणि प्रत्येक समुदाय हे कोडं सोडवीत होता की .....  कोण आहे विश्वाचा नियंता.....? हाच शोध घेता घेता त्या त्या ठिकाणचे आहार, रहन-सहन, कृषी, अर्थ व्यवहार त्यात रिफ्लेक्ट होत गेले... भिन्न भिन्न धर्म उदयास आले आणि कुठे तरी आस्तित्वाचा शोध वर्चस्वाचा होऊ लागला....! राम रहीम कुणाला पाहिजे...? दुर्दैव माणुसकी संपली... आणि दंगली होऊ लागल्या... आंधळे, विकारी, बीनडोक लोकांची गर्दी जमु लागली आणि गर्दीचा फायदा घेणारे सुद्धा.... आणि दंगल हा व्यवसाय झाला....काही लोकांचा... चुकी गर्दीची आहे चुकी गर्दीतल्या आपल्या चेहर्याची आहे... विष कालवू नका... विषारी साँप ओळखा... सर्व धर्मांचा आदर करा.... सर्व धर्मांचा अभ्यास करा.... जिथे सूर्य तापलेला असतो ते अर्थातच चंद्राची पूजा

मनमौजी फ़कीरा..!

आज काल मनमौजी मस्तमौला फ़क़ीर भेटन्यासाठी आतुरच असतो पण मीच त्याच्याकडे खूप दुर्लक्ष करीत असतो..... ऑफिसच्या गड़बडीचं कारन तर कधी आम्लपित्त... कधी मित्राशी महत्वाच्या कदाचित नसलेल्या गोष्टिसोबत गप्पा.... आणि बरंच आणि सहसा निरर्थकच्.... सहज भाव असावा म्हणून करावं असं काही.... तर पुन्हा प्रश्न पडतो करत असलो आवर्जून तर भाव सहज कसा म्हणावा...? असो.... आज पुन्हा भेटले हो मला कालचे फ़क़ीर म्हणे कारे तू उदास कारे करितो फिकिर जरा बोल गड्या ईथे नको मनामधी ठेऊ व्यक्त होणं मोठं सूत्र समजून जरा घेऊ हसु आणि विसरणे जसे आहे मोठे सार तसे बोलने सरळ नको बसु गप्पगार जसं मनामधी आहे तसं जनामधी ठेव नको उगी लपाछपी तवा दिसतो रे देव देव तुझ्या मनामधी तूच झाकून ठेविला काढ़ एक एक थर बघ देवच राहिला एका हृदयशस्त्रक्रिया दालना बाहेर लिहिले होते की..... वेळीच योग्य ठिकाणी ओपन केले असते तर आज कात्रीने उघडायची वेळ आली नसती। चला सारे व्यक्त होउयात.... हसूयात.... विसरुयात..... आणि व्यक्त होउयात....

हसनं हीच साईकल...!

एक मानुस दररोज एका चेक पोस्ट समोरून साइकिल वरुण गोनी घेऊन जात असे आणि चेक पोस्ट वरील इंस्पेक्टर दररोज त्याची गोनी न चुकता चेक करत असे.... आणि त्यात दर रोजच वाळू सापडत असे. असा नित्यक्रम जवळ जवळ वर्षभर चालला असेल. नंतर त्या इंस्पेक्टरची बदली झाली आणि त्या मानसाचे ही सायकल वरुन वाळूची गोनी घेऊन जाने बंद झाले. काही दिवसांनी त्या शहरात चोरी केलेल्या जवळ जवळ 250 ते 300 सायकली सापडतात. चला आता खरी गम्मत....करुया..... आपलहि असं च काहीसं होतं... सुख हे त्या सायकली प्रमाणे .... आणि इंस्पेक्टर म्हणजे आपण स्वतः गोनी आणि वाळू म्हणजे बिन महत्वाच्या गोष्टि.... आयुष्य निघुन जातं आणि आपण मात्र वाळू आणि गोनी यातच अडकून बसतो. सुख सायकल सारखं लख्ख डोळ्यासमोर...... आपण मात्र लक्षही देत नाही.... आणि शेवटी मात्र हाच विचार असतो की साइकिल लख्ख समोर होती आणि आपण...... हँसा साइकिल कड़े लक्ष्य ठेवा... गोनी मधे अड़कु नका... चला हसूया हसूया चला हसूया हसूया अनमोल आहे असे चला आज हो अर्पूया देव राजा त्या मनीचा ज्यात हसु वसतसे देव त्याच्या साठी उभा जो सदा हसतसे आज मोकळे मोकळे चल

मस्तमौला फ़क़ीर...!

मस्तमौला फ़क़ीर, मनमौजी अवलिया भेटला काल.... नजर भीड़लि आणि फ़क़ीर बोलू लागला..... आकाशात गूढ़ नजर स्थीर करत, "मन कोषामधी असं फूल पाखरू पाखरू मोठं होऊ पाहे जीव गोड मधाळ साखरू...... मना धडपड अशी कशातच हो रमंना निघु पाहे कोषातुन तरी त्याला ते जमंना..... चालू दे रे धडपड जशी सहज स्वीकार नाही तर कोष तुझा अन् त्याची तू शिकार..... मना वाट पाहे रोज बळ नीतनेम वाढे हळू हळू तेच बळ त्याले कोषातुन काढ़े..... नको घाई धरसोड अगा नीतनेम बरा कोष आपोआप तूटे बघ पडल्यात चीरा....... बघ भासू लागलेत जीवा उडण्याचे बळ अगा तुझ्या पखामधी दम धर थोड़ा येळ...... कोष कशासाठी आहे त्याले कळते कळते तूझी धडपड मेली तूझी तुलाच छळते..... तूझी धडपड मेली तूझी तुलाच छळते......." आकाशात स्थिरावलेली ती गूढ़ नजर अस्तित्वाशी एकरूप झालेली..... रुजवित होती अस्तित्वाशी असलेलं खरं खुरं नातं.... ईश्वरी शक्तीचा खराखुरा स्पर्ष...... जो भेटतो फ़क्त आणि फ़क्त सहजतेतून.... मुक्त स्वातंत्र्यातुन.... बंधनमुक्त प्राणातून..... उघडलेल्या मनांतून...... स्वीकृतिच्या भावातुन...... आणि अपेक्षाशून्य

चंद्राची भाकर..!

मी: "अमुक कवीला म्हणे पोर्णिमेच्या चंद्रामधे भाकर दिसायची". ती:"का?" मी:"बहुतेक....तो उपाशी असेल दोन चार दिवसांपासून...!" ती:"का?" मी:"गरीब असेल....दोन वेळच्या जेवनाची भ्रांत.." ती:" कविता बऱ्या सूचतात ....उपाशिपोटि...!" मी:" कविता नाही गं ती, ते तर विचारांचं काहूर..! उर फूटेस्तोवर विचारला गेलेला एक प्रश्न या बधिर व्यवस्थेला...! ती:"त्यात व्यवस्थेचा काय दोष? त्याला कुणी थांबवलय काम करायला, पैसे कमवायला...?" मी:"थांबवलं नसेल असं तरी कसं म्हणावं, थांबवलं असेल एखाद्या प्रस्थापितानं कदाचित त्याची जात पाहून, थांबवलं असेल इथल्या न्यायव्यवस्थेनं कदाचित त्याच्याकड़े पैसा नव्हता म्हणून, थांबवलं असेल एखाद्या नीतिवान प्रतिष्टीतानं कदाचित तो खरं बोलतो म्हणून, थांबवलं असेल एखाद्या श्रद्धावान समूहानं कदाचित त्याला ...नेमका खरा देव कुठे असतो ते दाखवलं म्हणून, थांबवलं असेल त्याला मुखवटा धारण केलेल्या शेळ्पट लोकांनी कदाचित तो खरा चेहरा घेऊन मिरवतो म्हणून, थांबवलं असेल त्याला निर्बुद्ध धर्म

जंगलराज पेक्षा भयानक....!

Image
जंगलात फिरताना एक वाघ भेटला....! दचकलोच....! हसला अन् बोलला ,"अहो मानुस...ओ मानुस .... या जरा बसा........गप्पा मारुयात.....खूप दिवसांचं साठवून ठेवलय.....जरा मोकळं करुयात...बसा... अन् तुम्ही असं काय दचकतायत राव, माझीच फाटते तुम्हाला बघून.......... रक्ताची चटक माझ्या पेक्षा तुम्हालाच जास्त..!" ऐकून हादरलोच...! तो आणखी बोलू लागला.." हादरल्या सारखं काय करताय, खरं तेच बोलतोय मी.., अहो माणूसराव, तुम्ही आम्हाला जंगल राज, जंगल का कानून म्हणून हिनवत असता, पण मला सांगा आम्ही तरी निसर्गाच्या न्यायाने चालतो हो...आमची सारी उठाठेव अस्तित्वासाठी, तुमच्यासारखं नाही हो...!" "आमच्या सारखं नाही म्हणजे ... आम्ही काय करतो असं..?"---मी "अहो चिड़ताय काय असं .... मानुस आहात तुम्ही...चिड़ताय काय..? आणि हो मी सांगत होतो आमची लढाई अस्तित्वासाठी तुमच्या सारखं नाही वर्चस्वासाठी... तुमचं सारं वर्चस्वासाठी ......! मी मोठा की तू मोठा..! शिकार करणारा मी आणि शिकार झालेला हरिण दोघेही आपापला धर्म सांभाळतो...दोघे ही जीवाच्या आकांतानं जिवासाठीच धावतो...! तुमच्या सारखं नाह

दाभोळकरांचा देव समजून घेताना....!

आदरणीय दाभोळकर साहेब, आज तुम्हाला मुद्दामच पत्र लिहित आहे. निमित्त आहे आज तुमच्याशी बोलण्याचे. तुम्ही देवाला कधीच विरोध करत नाही उलट त्याच्या जवळ जाण्याचा, त्याला अनुभवण्याचा सहज मार्गच् तुम्ही आम्हाला सांगत असता नेहमीच, गाडगेबाबा सुद्धा असेच तुमच्यासारखे...! साहेब मुळात आम्हाला देव नकोच आहे, नाहीतर तो दिसलाच असता नं आम्हाला अन्तरात डोकवताना, निरागसपने हसतांना, मदतीचा हात देताना, हिरवाईला पाहताना, बरसणाऱ्या सरींना झेलताना आणि अनंत हातांनी कृपा बरसविनारा तो आहेच आत-बाहेर सारीकडे....... तुम्ही त्याच्याशी संवाद साधन्याची कलाच शिकवत आहात आम्हाला अंधश्रद्धा निर्मूलन नावानं...! अंधार असा कधी नसतोच नं साहेब , उजेड नसल्यामुळे त्याचं अस्तित्व..... देवासाठी आमचे समज ही तसेच अंधारासारखे , उजेड म्हणून तुमचा विचार लख्ख प्रकाश म्हणून येतो आणि आमच्या श्रद्धे मधला अंधार लीलया काढून टाकतो. सश्रद्ध आणि अंधश्रद्ध यातील फरकच तर तुम्ही सांगता नं साहेब...! साहेब, श्रद्धाळु लोकं तर भक्ति जाणतात, शुद्ध प्रेम मयी भक्ति आणि ती रुजू लागली की माणसामधील देव हळू हळू खुलु लागतो. पण साहेब , आम्हाला देव नको अन

शिवाजी राजं समजून घेताना....!

शिवाजी समजून घेण्यासाठी म्हणे शिवाजी व्हावं लागतं इथं आम्ही मुर्दाड सारे तुम्हाला सांगायला काय जातं..! ईमान आम्ही विकलाय इथं विकल्यात आम्ही लाजा तुम्ही आम्हाला काय सांगता समजून शिवाजी राजा आमच्या मनांत मुसलमानांना कापनारा तो शिवाजी आमच्या मनांत हिरवं निशान  जाळनारा तो शिवाजी खरं सांगायचं तं शिवाजीसाठी नमाज़ पढायचा काजी असा सारा सावळा गोंधळ कसा समजनार राजा शिवाजी स्वराज्यासाठी प्राणपणानं मावळा आमचा लढला आज मात्र ज्यानं त्यानं जातीनं निवडून काढला मी अमक्या जातीचा म्हणत लढला असेल का तानाजी हो असेल उत्तर तर कसा समजनार राजा शिवाजी ज्यानं त्यानं सोयीसोयीनं इतिहास असा रचला याचा वाढला स्वाभिमान त्याचा मात्र खचला या इतिहासाला महाराज सुद्धा झाले असतेत का राजी हो असेल उत्तर तर कसा समजनार राजा शिवाजी "बघतोस काय, मुजरा कर." तिच्याकडे बघताना "राजे,तुम्ही परत या." बार मधून निघताना राजे परत येण्यासाठी कुठे जिजाऊ अन् कुठे शहाजी तुम्हीच सांगा आता परत कसा येणार राजा शिवाजी मातोश्री नाव जिजाऊंचे अवघ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान या मराठी माते

असच अस्तेय भौ...!

"आपल्याला नै आवडत भो जाती बीती..अन् आपण मानित बी नै ते...आई शप्पत..! खोट्टं कयला बोलाव भो. तुला सांगतो नवले आपण लै काम केलय् गोरगरिबांसाठी.. हव..!  अन् तेच्यात बी एस शी ,एस टी तुला सांगतो बघ एन टी - बिन टी सगळे ...साऱ्या केटेगरी बर्ं का..हव..! दरवर्षी आपण वह्या वाटितो गरीबांना..!  अन् तुला सांगतो बघ... कार्यक्रम एकदम जंगी बर्ं का...हव..एकदम जंगी...! हे मोक्कार लोकं..झेड पी बिड पि चट...हव..! गेल्या वर्षी त भौ ...आमदार साहेब न भौ ....! तुला सांगतो नुसता धुर भौ नुसता धुर...! बैनर तर इच्चारुच नको...हेई शप्पथ....! एकदम कड़क...हव...! फुल्ल हवा...! नुसता धूर च काढतो भौ आपण...!बातमी अस्ति न आपली ... पेप्रात..! पुण्यनगरी म्हणू नको, सक्काळ म्हणू नको इथून तिथून चट...हव...!  ओळखी लै आपल्या...! नुसत्या फोनवर .....नुसत्या फोनवर कामं ...!  वह्या वाटप सोबत टोरलामेंट अस्ति एक टेनिस बॉलवर...!" तो सांगतच होता... "लास्ट टाइम त्यांची जरा जास्तच जळली...अन् तुला तं महितच हे आपल्या गावात तेंचि टूरटूर जरा जास्तीच् होऊन राहिली ते..! मंग म्हनलं होऊन जाऊ दे..! आशे गपगार झाले

दरोडेखोर...!

वाल्या कोळी एक सुप्रसिद्ध दरोडेखोर...! वाल्मीकि एक महान कवी...साहित्यिक वगैरे... आणि वाल्या कोळी आणि वाल्मीकि दोन्ही व्यक्ति एकच .....  हा एक डोळ्यात अंजन घालनारा योगायोग....! वाल्मीकि होण्यासाठी वाल्या कोळ्याला त्याचा जन्म आणि त्याचे कर्म दोन्हीही आडवं आलं नाही हे एक दुर्लक्षित सत्य...! आणि वाल्या कोळ्याचा वाल्मीकि होण्यासाठी कारणीभूत ठरलेला एक महत्वाचा क्षण असा की वाल्याला त्याच्या घरच्यांनी एका योग्य क्षणी नाकारलं ते....! आज आपल्या आजुबाजूला कित्येक वाल्या कोळी टाकत आहेत दरोडे सरसकट... .... कित्येक तर दरोडा हे आद्य कर्तव्य समजून केलेल्या भ्रष्ठ आचरणाचे नैतिक समर्थन देतात..... कित्येक जन ग़ाफ़िल आहेत बायका मुलांना पैशातुन मिळनारी प्रतिष्ठा पाहून...... कित्येकांनी तर दरोडा हाच जीवनमार्ग करुन घेतलाय..... कित्येक दरोडेखोर पांघरून आहेत भम्पक नैतिकतेचा बुरखा.....आणि लीलया करीत आहेत भ्रष्ठ आचरण...... आणि याच दरोडेखोरांची पिलावळ करत आहे निर्लज्ज थयथयाट भरदिवसा....भरचौकात.....नग्नताण्डव...! या साऱ्या वाल्या कोळ्यांचा वाल्मीकि कधी होणार.....! त्याच्या आयुष्यात

प्रीय मित्रा......

Image
प्रिय मित्रा.... तू नेहमीच सांगत आलाय इंजीनियरिंग हे तुझं क्षेत्र नाही, काहीतरी वेगळं कर.... म्हणून त्यात राहून तुला आवडेल असं काही करत आहे. लिहित आहे.... फिरकी  शब्द विचित्र जरी वाटत असला तरी आपल्या ला तो बरा वाटतो... शाहन्याला शब्दाचा मार.... जेव्हा आपन सोबत होतो तेव्हा खुपच निरागस होतो.... समाजाच्या काळ्या गडद रंग छठा तेव्हा सुद्धा तितक्याच् गडद होत्या मात्र आपल्या मैत्रीचा रंग औरच.... तो रंग आज ही तसाच अबाधित आहे मात्र तरीही इतर रंग कळत नकळत कधी मिक्स झाले ते खरोखर कळले नाही.... फिरकी त्या साठीच ..... नियमित वाचत जा... म्हणजे मी लिहित जाईल... तेव्हाचा निरागस पणा मी सुद्धा हरवून बसलोय.... चल शोधुयात..... तू सुद्धा बोलत जा....एखाद्या ओळीत.... चुकलं काही तर...सांगत जा..... म्हणजे मी लिहित जाईल..... तुझाच मित्र महेश
। बहुजन प्रतिपालक सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवराय । माझा राजा आज राजा झाला। रयतेचा विश्वास जागा झाला । तेली कोळी कुनबी सारे बंधू माझे एक झाले स्वराज्य माझे या राजाने स्वप्न जे ते सत्य झाले। जाती अन्ताचा प्रयत्न करणारा आद्य समाज सुधारक --माझा राजा शुर लढवय्या जात सार्यांचीच हे दाखवनारा ----- माझा राजा हिन्दू मुस्लिम दरी संपविनारा---- राजा माझा स्री जातीचा विश्वास ---- राजा माझा ज्याच्या साठी तानाजी हसत हसत लढत गेला असा ----- राजा माझा ज्याच्या साठी जीवा महाला जीवा वरती उदार झाला असा----- राजा माझा सावल्या तांडेल प्रामाणिक तो जो म्हणाला राजाला ही खबरदार जर टाच मारुनी येई पुढे रे गड्या चिंधड्या उडविल राइ राइ एवढ्या ----अशी प्रशासनातील शिस्त जपनारे बहुजन वीर ओळखनारा ------राजा माझा काय काय सांगू ..... आज ही समजू न शकलेला.... कुजलेल्या मेंदूंच्या आवाक्यात न आलेला..... सडलेल्या बुद्धिला सतत अड्सर ठरलेला..... कपटी कारस्थानि बुद्धि ला सतत खुपनारा..... आणि 90%नालायक पिढीला चुकीचा समजलेला तरी ही ज्यांना समजला त्यांच्यातून कोटि कोटि शिवाजी जन्मांस आननारा --