धर्म...दंगल..अन् माणूस..!

धर्म म्हणजे देवाला जाणून घेण्याचा मार्ग...
देव जो सर्वव्यापी..
जो जळी,स्थळी,काष्टि, पाषाणी,आत बाहेर सर्व.....

पाण्यात बुडालेल्या हंड्या सारखे आपण...पाणी हंड्यात आहे की हंडा पाण्यात हे कसं ओळखनार....अगदी तसं....

हेच कोडं सोडण्याचा प्रयत्न चालू झाला आणि चालू आहे आणि चालू राहील निरंतर....
पूर्वी जग जोडलेलं नव्हतं आणि प्रत्येक समुदाय हे कोडं सोडवीत होता की .....  कोण आहे विश्वाचा नियंता.....?
हाच शोध घेता घेता त्या त्या ठिकाणचे आहार, रहन-सहन, कृषी, अर्थ व्यवहार त्यात रिफ्लेक्ट होत गेले... भिन्न भिन्न धर्म उदयास आले आणि कुठे तरी आस्तित्वाचा शोध वर्चस्वाचा होऊ लागला....!

राम रहीम कुणाला पाहिजे...?

दुर्दैव
माणुसकी संपली...
आणि दंगली होऊ लागल्या...
आंधळे, विकारी, बीनडोक लोकांची गर्दी जमु लागली आणि गर्दीचा फायदा घेणारे सुद्धा....

आणि दंगल हा व्यवसाय झाला....काही लोकांचा...

चुकी गर्दीची आहे
चुकी गर्दीतल्या आपल्या चेहर्याची आहे...

विष कालवू नका...
विषारी साँप ओळखा...
सर्व धर्मांचा आदर करा....
सर्व धर्मांचा अभ्यास करा....

जिथे सूर्य तापलेला असतो ते अर्थातच चंद्राची पूजा करणार
आणि जिथं मुबलक पिकतं ते अर्थातच शाकाहारी असणार....!

धर्माची जोड़ ईश्वरी सत्तेशी लावा.....
हात जोडून विनंती ......

आपण जर वयस्क असाल तर थोड्यासाठी विष कालवू नका...आणि झालेली चूक सुधारा....
आपण जर तरुण असाल तर हा विचार पोहोचु द्या किमान तुमच्या स्वतःच्या हृदयात...
आणि लहान लेकरांनो तुम्ही मानुस म्हणून मोठे व्हा....
आम्ही तुम्हाला मानुस बनविन्याची शपथ घेतो.





आजच्या मोठ्या बातमीतूण खूप मोठा धड़ा घेऊन...
चला चूका सुधुरुयात...
एकत्र येऊन प्रेमाने उद्याचा मानुस बनवूयात....
मानव धर्म स्विकारुयात...

विमल-हरी...!



Comments

Unknown said…
Aadhyatma kade jhuklela kal prakarshane janvat ahe sir
Unknown said…
चला चुका सुधरवूया

Popular posts from this blog

दत्त

शून्य

तू माझा सांगाती । काय वर्णु तुझे....!